HW News Marathi
Covid-19

कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना महाराष्ट्राबाबत मोदींनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली। महाराष्ट्र सह देशावर गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच संकट घोंगावत आहे. सर्वच राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यापैकी काही राज्यांमध्ये ही परिस्थिती चिंताजनक आहे. तर काही राज्यांमध्ये परिस्थिती निवरली आहे, तर याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली असून राज्यांना कोरोनाशी लढण्याच सूत्र देखिल सांगितलं आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, आधी तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की, ज्या राज्यांमधून करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे.

ज्या ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, त्या राज्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करुन कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. कारण जसंजशी रुग्णवाढ होते, तसतसा हा विषाणू आपली रुपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे.कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांबद्दल ते म्हणतात की, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण आधी ही रणनीती अवलंबली आहे. आत्ताही आपल्याला तेच करायचं आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लस…याच रणनीतीच्या आधारावर आपल्याला पुढे जायचं आहे.

तसंच ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवं तसंत मायक्रो कन्टेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवं.अस देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. त्याचबरोबर संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर कोरोनाशी लढण्याचं एक अस्त्र म्हणून करायचा आहे. असेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या राज्यात कोरोनाचा कहर वाढतोय त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला केंद्र सरकारने लागू केलेल्या २३ कोटींच्या कोरोना पॅकेजचा वापर वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करण्यासाठी करायला हवा असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माय लॉर्ड, मंदिरे उघडा हो !… ‘शिवसेने’ची मागणी 

News Desk

पुण्यातील वारजे परिसरात प्ररप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी

News Desk

केंद्र व राज्य सरकारने केलेल्या सूचना तंतोतंत पाळूया नाहीतर… शरद पवार काय म्हणाले ?

Arati More