HW News Marathi
देश / विदेश

‘अब्बा जान’ वक्तव्यावरुन नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथांना म्हणाले….!

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका वक्तव्यावरून ते चांगलेच चर्चेत आहेत. भाजपचं सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात होता, आता सगळ्यांना समान न्याय मिळतो. 2017 पूर्वी जे अब्बा जान म्हणत होते तेच रेशन संपवत होते असं वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यावरून ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

‘अब्बा जान’चं वक्तव्य अपमानास्पद

नासिरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथांना फटकारलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी केलेलं अब्बाजान वक्तव्य हे आक्षेपार्ह असून अपमानास्पद आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखंही काही नाही असंही शाह यांनी म्हटलं आहे. ही व्यक्ती (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) जी आहे त्यावर प्रतिक्रिया काय देणार? अब्बा जान हे वक्तव्य द्वेषयुक्त वक्तव्यांचा भाग आहे, अशा प्रकारची वक्तव्यं ते आधीपासून बोलत होते अशीही टीका नसीरूद्दीन शाह यांनी केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत नसीरूद्दीन शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कुशीनगरमध्ये विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांवर विशेषकरून समाजवादी पार्टी (सपा)वर निशाणा साधला आणि आरोप केला की, ‘समाजवादी पार्टीचे सरकार गरीबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. अब्बा जान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहोचवत होते. 2017 च्या आधी गरीबांना रेशन का मिळत नव्हते? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरीबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते आणि त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहोचत होतं. आज गरीबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजप नाही’, केंद्रीय कृषीमंत्र्यांचा हल्लाबोल

News Desk

पर्रिकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री

News Desk

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पायलटला मायदेशी पाठवण्याची जोरदार मागणी

News Desk