HW News Marathi
देश / विदेश

‘संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की तर ‘गुजरात मॉडेल’, नवाब मालिकांची खोचक टीका

मुंबई | राज्यसभेत काल(११ ऑगस्ट) झालेल्या गोंधळामुळे राजकारण पेटलं आहे. संसदेत काल जे घडले ते अलोकतांत्रिक गुजरात मॉडेलची प्रतिकृती होती, असा थेट आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बळाचा

राज्यसभेत झालेल्या गोंधळामुळे विरोधी पक्षातले नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुजरातमधील भाजप सरकार विधानसभेत विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर करते आणि आता भाजपच्या नेतृत्वाखालील हे केंद्र सरकार संसदेतही तेच करत आहे, असा प्रहारही नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान #MurderOfDemocracy हा हॅशटॅग वापरत नवाब मलिक यांनी ट्वीटवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

केंद्राला विचारणा करायला हवी

संसदेत महिला सदस्यांना पुरुष मार्शलकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावर राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत केंद्राला विचारणा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगासस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते, असा दावाही त्यांनी केला आहे.

शरद पवार संतापले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कोणत्याही सभागृहात असं चित्रं पाहिलं नाही. हे पवारांसारख्या नेत्याला अस्वस्थतेतून बोलावं लागलं. माझ्याशी बोलले ते. मीडियाशी बोलले. ते फार अस्वस्थ होते. ज्यांनी संपूर्ण हयात संसदीय राजकारणात घालवली आहे ते सर्व नेते अस्वस्थ होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी

राज्यसभेत काल(११ ऑगस्ट) झालेल्या गोंधळावरून विरोधी पक्ष आता चांगलाच भडकलेला आहे. राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना पाचारण करता ही कसली मर्दानगी आहे?, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रश्मी शुक्लांचा जबाब अखेर नोंदवला, मुंबई पोलिसांची टीम हैदराबादेतील निवासस्थानी पोहोचली

News Desk

आज मध्यरात्री दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण

News Desk

भारतीय वंशाचा १२ वर्षीय मुलगा ठरला लंडनमध्ये ‘जिनिअस’

News Desk