HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून कॅबिनेटच्या बैठकीत निश्चितरुपाने मदत जाहीर करेल – नवाब मलिक

मुंबई | कुठल्याही शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात अडचणीत राहू देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरुपाने मदत जाहीर करेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय मुख्यमंत्रीही दौर्‍यावर आहेत. दौर्‍यावरुन परत आल्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितरुपाने भरपाई देण्याची भूमिका राहणार आहे. त्याचबरोबर केंद्रानेही इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर मदत करण्याची जबाबदारी असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनुकूल, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ करप्रणालीचा अवलंब आवश्यक, व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

Aprna

नाशिक शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट

Aprna

पर्यावरण पूरक गणेश मुर्ती, सांगली जिल्ह्यातला आदर्श उपक्रम

News Desk