HW News Marathi
महाराष्ट्र

हायड्रोजन सोडून ऑक्सिजनची गरज लागेल!;, शेलारांची बोचरी टीका

मुंबई | नवाब मलिकांना हायड्रोजन सोडून ऑक्सिजनची गरज लागंल, असे वाटतं, अशी बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार केली. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणाऱ्यांनी लवंगीही लावू शकलं नाहीत. लवंगी लावण्याचा प्रयत्नात त्यांनी त्यांचं हात पोळलं. मलिकांची हतबलता इतकी होती की, त्यांना हायड्रोजन सोडून ऑक्सिजनची गरज लागंल, असं शेलार म्हणालं.

राज्यात तीन पक्षाचं सरकार एकत्र येवून ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप लावू शकलं नाहीत. मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफत आणि हाजी हैदर भाजपच्या कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना विविध बोर्डावर बसविण्यात आलं. तसेच हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर गुन्हा नसल्याचं स्पष्ट झाल्यावरच त्यांना अध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती शेलारांनी पत्रकार परिषदेतून दिली.

रियाज भाटींचा फडणवीसांशी काही संबंध नाही

मलिकांनी रियाज भाटींचा उल्लंख केला तर पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधान कार्यक्रम यांच्याशी काही संबंध नाही. यानंतर शेलारांनी फोटोवरुन संबंध प्रस्थापित करायचं असतील. तर मी रियाज काझीचं फोटो दाखवतो म्हणत रियाज भाटीचे राष्ट्रवादीचं सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासोबतचे फोटो त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवलं. रियाज भाटीशी देवेंद्र फडणवीसचा संबंध असण्याचं कारण नाही.

 

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राहुल गांधींमध्ये सातत्याचा थोडासा अभाव’ शरद पवारांची प्रतिक्रिया!

News Desk

निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात?

News Desk

‘घोषणाबहाद्दर विजय वड्डेटीवारांनी राजीनामा द्यावा’, गोपीचंद पडळकरांची मागणी

News Desk