HW News Marathi
महाराष्ट्र

ज्या वेगात भाजप सत्तेवर आले त्याच वेगाने पराभूत होईल- अजित पवार

सोलापूर: भाजप सरकार ज्या वेगाने सत्तेत आले आहे, त्याच वेगाने कोसळेल, असे वक्तव्य राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ते गुरूवारी सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, राज्यातही सरकारची शेतक-यांबाबतची धोरणे चुकत आहेत.

सरकारची धोरणे ही केवळ उद्योगपतींचे भले करणारी आहेत. शेतकºयाला बोगस म्हणणारे सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. कर्ज घेण्यास शेतकरी अपात्र असू शकतो, पण सात बारा असणारा शेतकरी बोगस कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने मस्तीत वागू नये. जनता ही मस्ती उतरवू शकते. राज्यकर्त्यांची अशी मग्रुरी राज्याच्या इतिहासात कधी दिसली नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार पर्यंत राजकारणाची संस्कृती जोपासली. आजचे सत्ताधारी मात्र हा इतिहास कलंकित करत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साहित्य संमेलन ऐतिहासिक होण्यासाठी उदगीरकरांनी झोकून देऊन काम करावे! –  संजय बनसोडे

Aprna

राज्यपालांना चार दिवसांनंतर रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Aprna

सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार! – उद्धव ठाकरे

Aprna