HW News Marathi
महाराष्ट्र

माजी २ मुख्यमंत्र्याच्या गावी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपचं खिंडार

यवतमाळ | काँग्रेसच्या २ दिग्गज माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातच भाजपानं विजय मिळवल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली हे स्व. वसंतराव नाईक आणि स्व. सुधाकरराव नाईक या महाराष्ट्राच्या दोन मुख्यमंत्र्यांचे गाव आहे. या गावात गेल्या अनेक काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. अखेर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं आहे. गहुली ग्रामपंचायत आमदार निलय नाईक यांच्या ताब्यात गेल्यानं याची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे.

१९४९ पासून बिनविरोध असलेल्या गहुली या गावी प्रथमच होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपचे ७ पैकी ७ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या गडाला खिंडार पडल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून निलय नाईक यांची लढत त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार इंद्रनिल नाईक यांच्याशी होत आली आहे. हे दोघेही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील आहेत.

निलय नाईक यांचा परिचय

निलय नाईक यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. निलय नाईक हे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत. निलय नाईक यांनी 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. नाईक परिवार राष्ट्रवादीशी एकनिष्ठ मानला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक निवडणुका ‘या’ महिन्यात? शरद पवारांनी दिले कामाला लागण्याचे आदेश!

News Desk

बहुजन नेत्यांचे भाजपमध्ये खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा चुकीची – पंकजा मुंडे

News Desk

फडणवीसांनी दुसरा ज्योतिषी शोधावा । बाळासाहेब थोरात

swarit