HW News Marathi
महाराष्ट्र

राफेलचे भूत या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही !

नांदेड | पुलवामा येथे जवानांवर दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात ४० पेक्षा जवान शहीद झाले. हे देशातील सर्वात मोठे संकट आहे. हे देशातील सर्वात मोठे संकट असून संकटसमयी आपण सर्व एकत्र येतो. परंतु या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा निशाणा साधाला. मोदी म्हणायचे ना खाऊंगा ना खाने दुंगा पण यांनी राफेल विमानामध्ये मोठा भ्रष्टाचार केला. राफेलचे पैसे कोणच्या खिशात गेले ? राफेलचे भूत या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही. अशा खोटारड्या लोकांच्या हाती पुन्हा सरकार देऊ नका, असे म्हणात पवारांनी मोदींवर तोफ डागली.

नांदेड येथील इंदिरा गांधी मैदानावर काल (२० फेब्रुवारी) सभा पार पडली. या सभेत महाआघाडीच्या प्रसार सभेच्या पहिल्या प्रचार सभेत नोटाबंदी आणि जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडल्याचेही ते पवार म्हणाले. यासभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, पीआरपी आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीची महाराष्ट्रातील पहिली होती. “पुलवामा हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गृहमंत्र्यांनी देशातील प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत आयोजित केली. मला ही या बैठकीत उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. हातातले सर्व कामे सोडून आम्ही सर्व लोक दिल्लीच्या त्या बैठकीत उपस्थित राहिलो. हा हल्ला कसा झाला हे आम्हाला सांगितले गेले. या हल्ल्यामागे पाकिस्तानची साजिश होती, शस्त्रपुरती होती म्हणून हा हल्ला घडवण्यात आला. इतकी महत्वपूर्ण बैठक असताना पंतप्रधान मोदी त्या बैठकीत उपस्थित नव्हते न भाजपचे लोक उपस्थित होते. या पक्षाकडे सत्ता आहे, सरकार आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्या पक्षाचे लोखच त्या बैठकीत उपस्थित नव्हते ही दुर्दैवी बाब आहे,” अशा खोचक शब्दात टीका केली आहे.

साडे चार वर्षात पंतप्रधा नरेंद्र मोदींनी काय केले ? नोटाबंदी करून यांनी कोट्यवधीस रुपयांचे नुकसान केले. शेती उद्ध्वस्त केली, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. या नोटाबंदीत मोठ्या लोकांपेक्षा गरीबांचा लोकांचा पैसा गेला. जीएसटी आणली सर्व व्यापाऱ्यांचे जीवन उदवस्त केले. व्यापारी मोदी विरोधात झाला आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. यांची कर्जमाफी फसवी निघाली. आत्महत्या वाढल्या आहेत. शेतीमालाला किंमत नाही बळीराजा अस्वस्थ झाला आहे. तो उद्ध्वस्त झाला तर देश उद्धवस्त होईल. हे भाजपचे पाप असेल. देशातील सर्व संस्था आज उद्ध्वस्त करायला हे निघाले आहेत. हे सरकार आश्वासन मोठे देते पण करत काही नाही, धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांनी बारामतीत आश्वासन दिले होते. अजूनही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. मराठा आरक्षण आज कोर्टात प्रलंबित आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना मोठा दिलासा, चौकशी तूर्तास बंद

News Desk

खाल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केल्यानंतर सामनातून त्यांची पाठराखण

News Desk

आम्ही सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ, फडणवीसांचं महत्वाचं विधान

News Desk