HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा केंद्रसरकारवर घणाघात!

सातारा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोदी सरकारला कोंडीत पकडायचा प्रयत्न करत असतात,आणि आता देखील तसच काहीसं झालं आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकार ईडी, सीबीआय अशा विविध केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचे प्रकार करतं. हा सत्तेचा दुरुपयोग असून त्याद्वारे स्थानिक सरकारचा उपमर्द करण्याचं काम ते नेहमीच करत आहेत. पण, त्यांना किती चौकशा लावायच्या आहेत त्या लावू देत, अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही, अशा शब्दात आता शरद पवार यांनी केंद्रसरकारवर शरसंधान साधल आहे.

ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगले होईल

शरद पवार हे महाबळेश्वर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकालावरही वक्तव्य केलं. हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल. तसेच पुढील निवडणुकीत सर्व जर एकत्र लढले, तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येईल, असे पवार यांनी म्हटले आहे.महाविकास आघाडीचे हे सरकार दोन दिवसात पडेल. नंतर ते दोन महिन्यात पडेल, तर नंतर हे सरकार एक वर्षात पडेल असे भविष्य अनेकजण वर्तवत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे देखील असे वारंवार बोलत असतात, असे सांगतानाच ते जर ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगले होईल, असा टोला देखील पवारांनी लगावाला आहे.

आगामी निवडणुका एकत्रित लढायचे का याबाबत आजच्या शिबिरात चर्चा करण्यात आल्याचंही पवार यांनी सांगितले. तसेच या संदर्भात नियोजन करण्यात आले असून स्थानिक निवडणुकांमध्ये युवकांना संधी मिळावी याबाबतही चर्चा झाली,असे पवार म्हणाले. एकंदरीतच या सगळ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्रातील विरोधकांवर बाण सोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लाज वाटली पाहिजे तुम्हाला…,” पुणे पोलिसांवर चित्रा वाघ संतापल्या

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरुन चर्चा; विखे पाटील म्हणाले काहीही चमत्कार होऊ शकतो…

News Desk

“….तर या विरोधात कोर्टात चॅलेंज करणार” – समीर वानखेडे

News Desk