HW News Marathi
महाराष्ट्र

‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?’, राष्ट्रवादीकडून अण्णा हजारेंना सवाल

मुंबई | देशात इंधन आणि पेट्रोलचे दार सातत्याने वाढत आहेत. त्यात भर म्हणून आता LPG मध्ये देखील आत एवढं झाली आहे. या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीने भाजपवर चांगलीच टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनाही चिमटा काढलाय. पेट्रोल पंप ‘गुडमॉर्निंग अण्णा’ बोलतोय तर गॅस सिलेंडर ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न शेजारी बसलेल्या अण्णा हजारे यांना विचारत असल्याचे व्यंगचित्र काढत क्लाईड क्रास्टो यांनी अण्णा हजारेंना फटकारलं आहे.

एवढ्या दिवसात कधी तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही

क्रास्टो यांनी अण्णा हजारेंवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर टीका केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एवढ्या दिवसात कधी तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही, असा आरोप क्रास्टो यांनी केलाय. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून चांगलं काम करणाऱ्या राज्य सरकारच्याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून अण्णा हजारे यांना वाढत्या पेट्रोल – डिझेल व गॅसच्या दरवाढीवर जोरदार चिमटा काढला आहे.

मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’

केंद्र सरकारकडून सातत्याने इंधनमध्ये वाढ होताना दिसत आहे. “केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना आज पुन्हा स्वयंपाकाचा गॅस 25 रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू आहे. जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे”, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मोदी सरकारचा पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला

महागाईच्या प्रश्नावरुन मोदी सरकारचा पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सातत्याने दरवाढ करत गॅस सिलिंडर 190 रुपयांनी महाग केला आहे. युपीए सरकारवेळी 440 रुपये असणारा हाच LPG गॅस आता 900 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस 900 रुपयांपर्यंत महाग केला आहे.

एवढा महाग गॅस गरीब, सामान्य जनेतला परवडणारा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य जनेतला वाऱ्यावर सोडून फक्त त्यांच्या मोजक्या उद्योगपती मित्रांचेच हित जोपासत आहेत. गेल्या 8 महिन्यात केंद्र सरकारने 67 वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल 107 रुपये, डिझेल 96 रुपये लिटर झाले आहे. गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल 25 लाख कोटी रुपयांची नफेखारी केली आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय – चित्रा वाघ

News Desk

पवारांची केंद्रावर टीका

News Desk

ढोल वाजवून सरकारला जाग आली नाही तर मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करु

News Desk