HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस कितीही प्रयत्न करा, बिघाडी काही होत नाही उलट आघाडी सरकार मजबूत होईल !

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचे वक्तव्य करून आघाडीत गैरसमज पसरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी बिघाडी काही होणार नाही उलट आघाडी सरकार मजबूत होईल हे फडणवीसांनी लक्षात ठेवावे असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे.

शरद पवार हेच पहाटेच्या सरकारचे सूत्रधार असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर महेश तपासे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजप सरकार आले नाही म्हणून आलेल्या आघाडी सरकारमध्ये बिघाडी कशी होईल ही खोड काही देवेंद्र फडणवीस यांची गेलेली दिसत नाही. त्यांनी कितीही चुकीची अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी बिघाडी होत नाही हे लक्षात ठेवावे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यामध्ये आदरणीय खासदार शरद पवारसाहेब यांचा हात होता हे जनतेलाही माहीत आहे याची आठवणही महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना करुन दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज’, शिवसेना खासदार संजय राऊत ठाकरे यांच्या भेटीला!

News Desk

…म्हणुन मी राजीनामा दिला,राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया 

News Desk

उद्योग व स्वयंरोजगाराला अर्थसहाय्याद्वारे गरजू घटकांना सक्षम बनवावे! – धनंजय मुंडे

News Desk