HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल | जयंत पाटील

मुंबई | “महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल”, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज (१ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मराठी बांधवांच्या समर्थनार्थ काळा दिवस पाळला जातो आहे. आज काळ्या फिती लावून हा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

कर्नाटकमधील मराठी सीमा वासियांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार व जुलुम याचा निषेध राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काळी फित लावून करत आहेतच शिवाय मंत्रीही निषेध व्यक्त करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

राज्यातील जनता सीमा भागात अडकलेल्या लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सुप्रीम कोर्टात केस सुरू असली तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अत्याचार थांबलेला नाही त्याचाही निषेध करत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी 12 जुलैला देवघर आणि पाटण्याला देणार भेट

Manasi Devkar

पर्रिकर यांच्या निधनाने जननेता, सच्चा देशभक्त हरपला: मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

News Desk

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस आपल्या पदावरून पायउतार

News Desk