HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान जवळपास ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवरून संघर्ष सुरू होता. राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना दुसऱ्याबाजुला अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शेतकरी ओल्या दुष्काळाशी दोन हात करत होता. यादरम्यान राज्यात जवळपास ३०० शेतकऱ्यांना आपला जीव गमविला लागला.

या पावसामुळे वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेतीचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना फटका बसला आणि जवळपास ७० टक्के पिकांचे नुकसान झाले. याआधी २०१५ साली ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. आपल्या मुलासारखे ज्या पीकाला वाढवले त्याची, अशी होणारी हानी होताना पाहिल्यावर या बापाने आत्महत्या करण्याचापर्याय अवलंबला.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सर्वाधिक आत्महत्यांमुळे २०१९ मधील शेतकरी आत्महत्येचा आकडा २०१८ पेक्षाही अधिक आहे. आत्महत्येच्या आकडेवारीचे जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंतचा समावेश केला जातो. २०१९ मध्ये एकूण २५३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून २०१८ मध्ये हा आकडा २५१८ इतका होता.

दरवर्षी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येत गत वर्षात शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत ६१ टक्क्यांनी वाढ झाली. राज्यात ऑक्टोबर महिन्यात १८६ तर नोव्हेंबर महिन्यात ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दुष्काळग्रस्त मराठवाड्यात झाल्या आहेत. मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यात १२० शेतकऱ्यांनी तर विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंवर गुन्हा दाखल! मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द बोलण्याने गुन्हा दाखल

News Desk

मुंबई डबेवाल्यांच्या मदतीला रोहित पवार पुढे सरसावले

News Desk

महावितरणच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतक-यांवर आत्महत्यांची वेळ –अजित पवार यांचा घणाघात

swarit