HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबईतील ए.पी.एम.सी मार्केटही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद

नवी मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा सद्यस्थितीला आकडा हा ४९ वर पोहोचला आहे. सगळीकडे गर्दी कशी कमी होईल याकडे शासनदेखील प्रयत्न करत आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आवाहन केले जात आहे. मुंबईत प्रवाशांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. दादर, कुर्ला यांसारख्या ठिकाणी दुकाने बंद करण्यात येत आहेत. तसेच, नवी मुंबईतही खबरदारी घेतली जात आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले नवी मुंबईतील ए.पी.एम.सी फळे आणि भाजीपाला मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे मार्केट आठवड्यातील दर गुरुवार आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे. ए.पी.एम.सी मार्केटमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. राज्यात आणि राज्याबाहेरुन दररोज शेतमालाच्या १२०० ते १५०० गाड्यांची आवक होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मार्केट पूर्ण बंद असल्याने इथे शुकशुकाट होता. मार्केटमध्ये एकाही गाडीला प्रवेश दिला जात नाही आहे.

मार्केटमधील काही वेळाही बदलण्यात आल्या आहेत. कांदा बटाटा मार्केटची वेळही बदलून दुपारी ४ वाजता हे मार्केट बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर एपीएमसी बाजार समिती शक्य ती सर्व खबरदारी घेत आहे. एपीएमसी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंची खरेदीची ऑर्डर फोनवरुन घ्या आणि माल घरपोच पाठवा, अशा सूचना प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच फळ आणि भाजी मार्केट 31 मार्च पर्यत दर गुरुवार आणी रविवारी साफसफाई तसेच निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय कांदा-बटाटा मार्केटची वेळ देखील बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी पालिका निवडणूक लढणार!

News Desk

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”, पडळकरांची टिका!

News Desk

पाणी प्रश्नावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची जलसंपदा अधिकाऱ्याला शिवीगाळ

News Desk