HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारचं डोकं सरकलय की काय ? निलेश राणेंचा पुन्हा एकदा राज्य सरकारवर प्रहार

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नवनवीन नियम लागू करत आहेत. तसेच, त्यात परिस्थिती अनुरूप बदल केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात पडत आहेत. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

“एकीकडे राज्य सरकार कोकणात जाणाऱ्यांना दहा दिवसाचा क्वारंटाईन नियम लागू केला आहे आणि दुसरीकडे त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतण्यासाठी १४ दिवसांचा क्वारंटाईन नियम लावत आहे. ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय”, असं टीकास्त्र त्यांनी राज्य सरकारवर सोडलं आहे.

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारनं क्वारन्टाईन कालावधीत सवलत दिली होती. १४ दिवसांवरून तो कालावधी १० दिवसांवर आणला होता. मात्र त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतण्यासाठी १४ दिवसाचा क्वारंटाईन नियम मुंबई महापालिकेने लावला आहे.

 

ज्या त्या भागातली परिस्थिती पाहून तिथल्या जिल्हा प्रशासनाने कोरोनासंबंधातली नियमावली तसेच लॉकडाऊन संबंधातील नियम आखावेत, असं राज्य सरकारने सांगितलं आहे. परंतू महाराष्ट्रातल्या अनेक भागांतली परिस्थिती वेगवेगळी असल्याने नियम देखील बदलत आहेत. याचाच त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असल्याचं एकंदर चित्र आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीएसटीच्या धसक्याने मुंबईत व्यापाऱ्याची आत्महत्या

News Desk

NCB च्या समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत नाही, गृहमंत्री वळसे-पाटलांची माहिती!

News Desk

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते !

News Desk