HW News Marathi
महाराष्ट्र

स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही राजांनी भाजपकडून हा प्रश्न सोडवावा असे त्यांनी काल(२९ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. ज्यांनी आपल्या नातावाची काढली ते मराठा आरक्षणाला मान काय देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

“पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं, आश्चर्य वाटतं… पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार. या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही”, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारली आहे. काल (२९ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यावरुन, उदयनराजे यांनी आरक्षण काढूनच टाका असे म्हटले होते. तर संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोका अशी भूमिका घेतली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी पक्ष सोडला म्हणूनच थोरातांना प्रदेशाध्यक्षपद, नाहीतर त्यांचे कर्तृत्व काय ?”

News Desk

भाजपामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले! – नाना पटोले

Aprna

फडणवीस बरे व्हावे म्हणून तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो – संजय राऊत

News Desk