HW News Marathi
महाराष्ट्र

म्हणे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली, उद्या ते गाडी पण धुतील मग काय करू?

मुंबई | कोरोनामुळे यंदाच्या वारीचे चित्र बदलले. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह मुंबईहून पंढरपूरला गेले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोबत ड्रायव्हर ठेवला नाही तर त्यांनी स्वत: गाडी चालवत मुंबई ते पंढरपूर असा प्रवास केला. राज्यातील मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे हे पाऊल त्यांनी उचलले.

दरम्यान, यावरून विरोधी पक्षाकडून टोलेबाजी करण्यास सुरुवात झाली आहेच. भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवली यावावर तोफ डागली आहे. ‘म्हणे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली. बरोबर आहे, सरकार अधिकारी चालवतायत, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो पण इकडे ७ तास मुख्यमंत्री गाडी चालवतो म्हणजे कोरोना या विषयावर सरकार किती गंभीर आहे दिसून येते. उद्या ते गाडी पण धुतील तर आम्ही काय करू’? अशा पडखर शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला व बालकांवरील अत्याचाराविरोधात राज्य सरकारकडून ‘शक्ती’ विधेयकाला मान्यता !

News Desk

सत्तेच्या हव्यासापोटीच महाराष्ट्राचा रेमडेसिवीरचा पुरवठा थांबवला, राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचा आरोप

News Desk

राज्यातील ही अनैसर्गिक युती फार काळ टिकणार नाही !

News Desk