HW News Marathi
महाराष्ट्र

शिवभोजन केंद्रामधून दारू विक्री, हे कसले वचन दिले होते स्व. बाळासाहेब ठाकरेंना?

मुंबई | राज्यात कोरोनाच्या या संकटकाळात अनेक श्रमिक, मजूर अनेक ठिकाणी अडकले आहेत. त्यामूळे त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय सरकार करत आहे. शिवसेनेने सुरु केलेली शिवभोजन थाळी या सर्व गरजूंनी जेवण देत आहे. मात्र, चांदूर येथून एक धक्कादायक बाब समोर आल्याची माहिती भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत दिली आहे.

चांदूर येथील शिवभोजन केंद्रावर शनिवारी (९ मे) पोलिसांनी एचानक छापा टाकल्यानंतर या केंद्रातून दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेत, खोट्या कागदपत्रांच्या आधारे केंद्राचा परवाना मिळाल्याचेही उघड करत चालकाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती राणेंनी ट्विट केलेल्या पोस्टमधये आहे.

या प्रकारानंतर शिवभोजन केंद्रातून दारु विक्री करताना जरा तरी लाज वाडू द्या, अशा शब्दांत निलेश राणेंनी शिवसेनेवर घाव केला आहे. तसेच, शिवरायांच्या नावाने सुरु केलेल्या या योजनेचे भान ठेवा आणि हेच वचन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना दिले होते का? असा सवालही यावेशी निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुरस्कार सोहळे स्थगित नव्या तारखेची होणार घोषणा

News Desk

महाराष्ट्र हे आता आत्महत्येचं डेस्टिनेशन होतंय का?, फडणवीसांचे आदित्य ठाकरेंवर शरसंधान

News Desk

नारायण राणे अजूनही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, विनायक राऊतांची पुन्हा टीका!

News Desk