HW News Marathi
महाराष्ट्र

‘ही भारतमातेसोबतची गद्दारी’; नितेश राणेंचा राऊतांना टोला

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेते केंद्र सरकारच्या विरोधात आरोप करत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते मात्र नवाब मलिकांवर करण्यात आलेल्या कारवाईचं समर्थन करत आहेत.

नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मलिक हे सत्य बोलत आहेत आणि त्यामुळे सूडबुद्धीने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. तर राऊतांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांना टोला लगावला आहे. राऊतांनी मलिकांचे समर्थन करणे म्हणजे एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी असल्याचे नितेश राणेंनी म्हंटले आहे.

नितेश राणे म्हणाले, “जनाब संजय राऊत आमच्या मुंबईवरती झालेल्या ९३ चा भेकड मुंबईब्लास्ट आपण सत्तेसाठी मुजरा करण्यात विसरलेला दिसतायत. या हल्यात २५७ मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते व ७१३ मुंबईकर जबर जखमी झाले होते. दाऊद ईब्राहीम त्यात सहभागी होता. हे तुमचे काँग्रेस सरकार सत्तेत असतानाच सिद्ध झाले होते. अशा देशद्रोह्यांसोबत भागिदारीचा आरोप नवाब मलिकांवर आहे.”

“त्याचा सखोल तपास झाला पाहिजे ही मागणी न करता तुम्ही मलिकांचा बचाव करण्यातच धन्यता मानता. ही एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी आहे”, असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे. तसेच आता या पुढे आपण मुबंईला ‘आपली मुंबई’ म्हणू नका. कारण सत्तेसाठी आपण सगळं विसरलात, असा राणे म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंह यांचं वेतन रोखलं; राज्य सरकारची कारवाई करण्यास सुरुवात

News Desk

नारायण राणे थेट उच्च न्यायालयात जाणार!

News Desk

शिर्डी द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

News Desk