HW News Marathi
महाराष्ट्र

बिहार देवेंद्रजीनी आणले महाराष्ट्राला पण देवेंद्रजीच पाहिजे..! 

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेल्या राजदला मागे टाकत जदयू आणि भाजपा यांनी आघाडी घेतलेली असली तरीही अद्याप बिहारचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपानेही यंदा बिहारमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. फडणवीस यांनीही बिहारमध्ये प्रचारसभांडा धडाका लावत चांगली कामगिरी केली. फडणवीसांनी सभा घेतलेल्या काही मतदारसंघातही भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. यानंतर महाराष्ट्रातील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी फडणवीस यांचं कौतुक केले आहे. बिहार देवेंद्रजीनी आणले..आता.. महाराष्ट्राला पण देवेंद्रजीच पाहिजे..पुन्हा येणार..येणारच!, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वाधिक नुकसानग्रस्त सणसर गावाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली भेट ;केली पाहणी

News Desk

भारतात मुस्लिम नाही तर हिंदू व्होट बँक आहे अन् राहील, असदुद्दीन ओवैसींचे वक्तव्य

News Desk

एटीएसने अटक केलेले आरोपी सनातनचे साधक नाहीत – चेतन राजहंस

Gauri Tilekar