HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येतंय, हीच ती वेळ ! नितेश राणेंचं सूचक ट्विट

मुंबई। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची मागणी केली, तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी आता ट्विट केले आहे. तर नितेश राणे म्हणतात की पुढच्या काळात महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होण्याचे सूतोवाच केले आहे. महाराष्ट्रात ‘भगव्या’च राज्य येते आहे. हीच ती वेळ !!!, असा लक्ष वेधून घेणारा मजकूर या ट्विटमध्ये आहे.

 

रविवारी प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. यात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्यासारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असे प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. त्यानंतर नितेश राणेंनी हे सूचक ट्विट करून आणखी खळबळ उडवून दिली आहे.

येणाऱ्या काळात महाराष्ट्रात खरंच राजकीय भूकंप होणार का?, याविषयी आता तर्क वितर्क लावले जातायेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Union Budget 2021 | शेतकऱ्यांना दीडपट जास्त MSP देणार – अर्थमंत्री

News Desk

‘कोमामधून ते अजून बाहेर आलेले नाहीत’, मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

News Desk

पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ होणार ?

swarit