HW News Marathi
देश / विदेश

‘या’कारणासाठी चक्क गडकरी,फडणवीस आणि जयंत पाटील एकत्र!

नवी दिल्ली | राजकरणात एकमेकांवर टीका करणे हे तर होत असतच. राजकारणात एकमेकांवर कितीही चिखलफेक केली तरी जेव्हा राज्याच्या हिताचा आणि विकासाचा प्रश्न येतो तेव्हा महाराष्ट्रातील नेते एका छताखाली एकत्र येऊन तो प्रश्न तडीस नेतात हे सुद्धा आज दिसून आले. आज केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी, राज्यातील विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या एकत्र येण्याने राजकरणात वेगळीच चर्चा सूरू झाली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी फडणवीस आणि पाटील आले होते. यावेळी भाजपचे खासदार गिरीश बापट, खासदार सुनील मेंढे, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, महापालिका आयुक्त, अधिकारी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नागपूरमधील गोसेखुर्द प्रकल्प, नाग नदीचे पुनरुज्जीवन आणि मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवनाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीच्या निमित्ताने फडणवीस, गडकरी आणि पाटील बऱ्याच दिवसानंतर एकत्र आले. विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने हे नेते एकत्र आले होते. या बैठकीत अत्यंत गंभीरपणे चर्चा सुरू होती. महाराष्ट्रातील नेते दिल्लीत विकास प्रकल्पाच्या निमित्ताने एकत्रित भेटण्याचं हे दिलासादायक होतं. निवडणूक काळात कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी निवडणुकीनंतर वैरही संपतं.

राजकीय चर्चा नाही

गडकरी, फडणवीस आणि पाटील एकत्र आल्याने राजकीय चर्चा रंगली नसती तर आश्चर्य वाटलं असतं. हे तिन्ही नेते एकत्र आल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. मात्र, ही केवळ प्रकल्पांना दिशेला लावण्यासाठी एक भेट असून त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यातच आजच्या दिल्लीत बैठकीला फडणवीसही उपस्थित होते. फडणवीस या बैठकीला का आले? त्यांचा या बैठकीशी काय संबंध? गोसेखुर्द प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी फडणवीस आले का? मग फडणवीसांनाच का बोलावले? नागपूरच्या खासदारांना का बोलावले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : आज देशभरात ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार

swarit

अखेर मोदी सरकारने जिंकला विश्वास

News Desk

298 भारतीय झाले पाकिस्तानी!

News Desk