HW News Marathi
Covid-19

खुशखबर ! बाप्पाच्या दर्शनाला गावी जाताना आता ई पासची गरज नाही

मुंबई | गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता होम क्वारंटाइन होण्याचा कालावधी १४ वरुन १० दिवसांवर करण्यात आला आहे. तसेच, एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही आहे. मात्र, खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावे लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचे आहे त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा दाखला प्रशासनाला दाखवावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (४ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत ही महत्वाची माहिती दिली आहे.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना १२ ऑगस्टपर्यंत कोकणात जाता येणार आहे. ICMR च्या निकषांप्रमाणे क्वारंटाईनचा कालावधी १० दिवस करण्यात आला असून १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांनी स्वब टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

तसेच, “एसटीनेदेखील ३००० बसेस तयार ठेवल्या असून त्यासाठी ग्रुप बुकिंग करता येणार आहे.ग्रुप बुकिंग केलेल्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे.यंदा एसटी ५०% प्रवासी क्षमतेने चालविण्यात येणार असूनदेखील त्यासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे आकारण्यात येणार नाही. एसटीने जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही इ-पासची गरज भासणार नाही”.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी यंदा नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. त्यामुळे चाकरमानी आणि गणेशभक्त आनंदाने बाप्पाच्या सणाला जाऊ शकणार आहेत. आणि बाप्पाकडे कोरोनाचे संकट लवकर टळावे यासाठी मनोभावे प्रार्थना करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे मुख्यमंत्री चांगले आहेत, पण… !

News Desk

पक्ष वाढवा कोरोना नाही, मुख्यमंत्र्यांची सर्व राजकीय पक्षांना तंबी

News Desk

जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची उद्यापासून होणार अँटिजेन टेस्टिंग! धनंजय मुंडेंचे निर्देश

News Desk