HW News Marathi
महाराष्ट्र

तो गाल सोडला अन् ओम पुरीचा गाल पकडला! – गुलाबराव पाटील

मुंबई | “आता मी तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला,” असे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत केले. गेल्या काही दिवसांपूर्वी पाटलांनी त्यांच्या मतदारसंघात रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती. यावर गुलाबराव पाटील यांच्यावर टीकेची झोड उटली होती. यानंतर आता त्यांच्या वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त केली होती. पाटील म्हणाले, “बोधवडला चुकीचे बोलून गेलो, लय चालले ते एवढे चालवले या कॅमेरावाल्यांना की अंदाज नाही. आता मी हेमा मालिनी त्यांचा गाल सोडला आणि ओमपुरीचा गाल पकडला. आता यावर कुणी टीका करू नये, असे म्हटल्यानंतर सभेत एकच हर्षा पीकला. आता लोके जो बोलायला लागला त्यांच्यावर मागे टीका करत असतात.” 

जळगावात सभेत बोलताना गुलबराव पाटील म्हणाले, ” गेल्या ३० वर्षे मी येथीला आमदार आहे. पण, या भागातील रस्ते चांगले करू शकला नाही. माझ्या धरणगाव मतदारसंघात तुम्ही या आणि बघा हेमा मालिनीच्या गालासारखे सुंदर रस्ते  आम्ही केले आहेत,” असे ते म्हणाले. पाटलांनी रस्त्यांची तुलना ही हेमा मालिनीच्या गालाशी केल्यामुळे राज्यात त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. यानंतर पाटलांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागतली होती. तेव्हा पाटील म्हणाले, “भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भवना दुखावल्या असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत माफी करा.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था 

News Desk

भटक्या, निराधार व्यक्तींचं प्राधान्याने लसीकरण करा!, केंद्राकडून राज्य सरकारला सूचना

News Desk

बजेटमध्ये महाराष्ट्र दिसत नाही, अर्थसंकल्पात थापा मारणं बंद करावं – संजय राऊत

News Desk