HW News Marathi
देश / विदेश

आता सरकारने मास्क, सॅनिटायझर्स रेशनच्या दुकानावर उपलब्ध करावेत !

मुंबई | राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझर्स हे रेशनच्या दुकानावर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मनविसेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे याबाबतची मागणी केली आहे. कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांकडून मास्क्स आणि सॅनिटायझर्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याची या वस्तूंचा साठेबाजार होत असून गेल्या अनेक दिवसांपासून या वस्तूंचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर, मनविसेकडून ही मागणी करण्यात आली आहे.

बाजारात सध्या मास्क्स आणि सॅनिटायझर्सचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने त्यांच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता राज्यात सरकारने मास्क आणि सॅनिटायझर्स रेशनच्या दुकानावर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी मनविसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मनविसेकडून अशी मागणी होत असली तरीही ‘नागरिकांनी मास्क्स आणि सॅनिटायझर्सचा आग्रह धरण्याची आवश्यकता नाही’, असे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिक मास्कच्याऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरू शकतात. त्याचप्रमाणे, सॅनिटायझर्सपेक्षा दिवसांतून शक्य तितक्या वेळा साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुतले तरीही चालू शकते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वारंवार आपल्या पत्रकार परिषदांमधून स्पष्ट केले आहे. सध्या बाजारात मास्क आणि सॅनिटायझर्सच्या सुरु असलेल्या साठेबाजीच्या पार्श्वभूमीवर हा उपाय सुचविण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेतन वाढीची मागणी अपुर्ण राहिल्याने आजपासून ३ दिवस बॅंकांचा संप

swarit

कोरोनावर मात करण्यासाठी भारताला वर्ल्ड बॅंकेने दिले आर्थिक सहाय्य

News Desk

आंदोलनावेळी शतकऱ्यांचे झालेले मृत्यू नसून त्या हत्याच – संजय राऊत

News Desk