HW News Marathi
Covid-19

आता महाराष्ट्राच्या बदनामीच्या षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण ? याची CBIने चौकशी करावी !

मुंबई | ‘सुशांतसिंहच्या शरिरात विषाचा अंश नाही’, असा अहवाल AIIMSने दिल्याने आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजपाने केलेले हीन पातळीवरचे राजकारण उघडे पडले आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येचे भांडवल करुन महाराष्ट्र, मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची बदनामी करणाऱ्या भाजपचे तोंड या अहवालामुळे काळे झाले असून भाजपा आणि मोदी सरकारमधील या षडयंत्रामागचे मास्टर माईंड कोण आहेत ? याचा तपास आता CBIने करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, “बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येला वेगळे वळण देत त्याचा वापर महाराष्ट्राला बदनाम करणे, बिहारच्या निवडणुकीत वापर करणे आणि मोदी सरकारचे सर्व पातळीवरचे अपयश लपवण्यासाठी केलेला भाजपाचा आटापीटा उघड झाला आहे. अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक घसरण, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली बेरोजगारी,कोरोना हाताळण्यात मोदी सरकारला आलेले अपयश, या सर्वांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे षडयंत्र रचले होते त्याचा पर्दाफाश झालेला आहे.”

देशातील तीन मोठ्या तपास यंत्रणांचा जोक बनवला !

“या संपूर्ण प्रकरणात संघराज्य प्रणाली उद्धवस्त करण्यात आली, CRPCचे उल्लंघन करण्यात आले, मुंबई पोलीसांची यथेच्छ बदनामी केली गेली आणि याला भारतीय जनता पक्षाने खंबीर साथ दिली. सुशांतसिंग प्रकरणात ब्रँड अम्बेसिडर राहिलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्र्वर पांडे यांना महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल मोठे बक्षीस देण्यात आले. पांडेंची स्वेच्छानिवृत्ती तत्काळ मंजूर करून भाजपाचा मित्रपक्ष संयुक्त जनता दलाने विधानसभा निवडणुकीची उमेदवारी बहाल केली. तर मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या भाजपाने यात देशातील तीन मोठ्या तपास यंत्रणांचा जोक बनवला आहे”, असेही सचिन सावंत म्हणाले.

मोदी सरकार पुरस्कृत ‘गोदी मीडिया ट्रायल’ झाली !

सचिन सावंत पुढे असेही म्हणाले कि, “देशातील या तपास यंत्रणांचा केलेला हा अपमान देशासाठी अत्यंत घातक आहे. या यंत्रणावर झालेला खर्च हा जनतेच्या पैशातूनच येतो, त्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली. मोदी सरकार पुरस्कृत ‘गोदी मीडिया ट्रायल’ झाली. विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या महाराष्ट्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे अत्यंत हीन पातळीवरचे राजकारण भाजपाने केले असून महाराष्ट्राची जनता त्यांना कदापी माफ करणार नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कहर ! राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांची नोंद ५० हजारांच्या जवळपास

News Desk

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा युजीसीच्या सूचनेनंतरच निर्णय, उदय सामंत यांची माहिती

News Desk

मजुरांची ने आण करतांना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी

News Desk