HW News Marathi
महाराष्ट्र

“आरक्षणाच्या विरोधात कोण आहे हे ओबीसी समाजाला समजले आहे”,धनंजय मुंडेंचा भाजपवर वार

धुळे। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. धनगर समाजाचा मेळावा या कार्यक्रमासाठी हे दोघे मंत्री धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आले असता मंत्री धनंजय मुंडे यांना बीड येथील एसटी चालकाच्या आत्महत्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत एसटी चालकाच्या आत्महत्ये संदर्भातील सर्व बाबी तपासल्या जातील खरंच वीज वितरण विभागातर्फे वीज कनेक्शन कापण्यात आले होते का, त्याचबरोबर त्यांच्या आत्महत्येचे मूळ कारण काय याचा देखील तपास सुरु असून काही तासातच त्याचं मूळ कारण काय होतं हे स्पष्ट होईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पोलिस याचा तपास लावतील

त्याचबरोबर कृज पार्टी प्रकरणात एनसीपी तर्फे या प्रकरणाचा तपास करणारे प्रमुख अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरती दोन पोलिस कर्मचारी पाळत ठेवत असल्याची तक्रार डीजीपिंकडे दाखल झाली असल्यास संदर्भात विचारणा केली असता मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यासंदर्भातील ही माहिती समजली असून पोलिसांकडे तक्रार असल्यामुळे पोलिस याचा तपास लावतील असं म्हणत या प्रश्नावर बोलणं टाळल आहे.

ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोण आहे हे ओबीसी समाजाला समजले

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार एम्पिरिकल डेटा देत नसून याबाबत आपली काय भूमिका आहे. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले केंद्र सरकार कोणत्या विचारांचे आहे. त्या विचारांना ओबीसी आरक्षण मान्य नसून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार होते, त्याच वेळी त्यांनी हा डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी तो अद्यापही सादर न केल्याने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोण आहे हे ओबीसी समाजाला समजले आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी भाजपावर केली आहे.

पुढील सहा महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील

मंत्री जयंत पाटील यांना धनगर समाजाचा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला धनगर व धनगड या शब्दामुळे निर्माण झालेल्या आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल विचारले असता हा वाद सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे…भाजपतर्फे 100 दिवसात मध्यवर्ती निवडणुका संदर्भात प्लॅन तयार केला असून राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याच्या संदर्भात विचारणा केली असता मध्यावधी निवडणुकांचा प्रश्नच येत नसून पुढील सहा महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे वक्तव्य जयंत पाटील यांनी यावेळी केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आपल्या आईची हत्या करुन अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली”, अर्णब गोस्वामींच्या वकीलांचा युक्तीवाद

News Desk

राज ठाकरे चंद्रकांत पाटलांना म्हणाले,’पुन्हा या’

News Desk

‘मिहान’ मधील प्रकल्पांना सवलतीच्या दरात वीज देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार! – सुभाष देसाई

Aprna