HW News Marathi
महाराष्ट्र

ही इंग्रजांची विधानसभा आहे का?, फडणवीस आक्रमक

नागपूर | ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली, असा आरोप देखील फडणवीसांनी शिवसेनेवर केला आहे. सावरकरांवर बोलण्यावर बंदी का?, असा सवाल फडणवीस सांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे. फडणवीस पुढे असे देखील म्हणाले की, “सावरकरांवर बोलण्याबद्दल कोणी थांबवू शकत नाही, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार, ” असा इशारा फडणवीसांनी दिला. भाजपने सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

‘ही विधानसभा ब्रिटिशांची नाही, तर महाराष्ट्राची आहे, ही लाचारी कशासाठी? हे आम्ही सहन करणार नाही, आम्ही सावरकरांवर बोलणारच, आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल, राहुल गांधी माफी मागेपर्यंत आम्ही शांत राहणार नाही’ असेही फडणवीस अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले. नागपूर हिवाळी अधिवेशनाला आज (१६ डिसेंबर) सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत.

अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी भाजपच्या सर्व आमदारांनी ‘मी सावरकर’ नावाच्या भगव्या टोप्या घातल्या होत्या. सावरकरांच्या मुद्द्यावर भाजपने गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूबही करावे लागले. भाजपचे नेते या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांबद्द केलेल्या विधानाचे पडसाद राज्याच्या अधिवेशनात पडलेले पाहायला मिळाले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापान्यावर देखील बहिष्कार टाकला होता.

राहुल गांधी नेमके काय बोले

राहुल गांधी शनिवारी (१४ डिसेंबर) भारत बचाव रॅलीच्या भाषणा दरम्यान भाजपवर टीका केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे”, असे त्यांनी म्हटले. राहुल गांधी पुढे म्हटले की, मी सत्यासाठी कधीच माफी मागणार नाही, मी मरेन पण माफी मागणार नाही. मात्र, मीच काय, पण काँग्रेसमधील कोणीही माफी मागणार नाही.” “जर कोणाला माफी मागायची आहे. तर नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदीबरोबर त्यांचे असिस्टंट अमित शहा यांनी देशाची माफी मागायला हवी. या देशाची शक्ती, अर्थव्यवस्था संपूर्ण जग पाहायचा. मात्र आज देशात काय होत आहे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला,” मोदी सरकारला केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालना रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट केला जाणार! – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Aprna

ही घटना निंदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही!

News Desk

हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

News Desk