HW News Marathi
महाराष्ट्र

“१३ तारखेला घडलेली घटना, ही १२ तारखेच्या घटनेचं रिएक्शन होती !”- देवेंद्र फडणवीस

मुंबई | “१३ तारखेला घडलेली घटना, ही १२ तारखेच्या घटनंची रिएक्शन होती, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणालं. “मी या घटनेचं समर्थन करणार नाही. कोणत्याच हिंसेचे समर्थन केले जावू शकत नाही,” असे मतही फडणवीसांनी आज (२१ नोव्हेंबर) पत्रकार परिषदतून मांडलं. “हे सांगण्याचं कारण या करिता आहेत. आता राज्य सरकार, सरकारमधील अधिकारी, अमरावती जिल्ह्यातील मंत्री, पालकमंत्री हे सगळे १२ तारखेची घटना डिलीट करून जनू १३ तारखेची घटनेबद्दल बोलत आहेत,” असा आरोप फडणवीसांनी यावेळी केला.

“यशोमती ठाकूर या १२ तारखेच्या घटनेवर का बोलत नाहीत? त्यांची मते कमी होणार म्हणून त्या बोलत नाहीत का? लांगूलचालून करण्यासाठी त्या बोलत नाहीत का? की, या मोर्च्यांची माहिती होती म्हणून त्यात बोलत नाहीत का? असे अनेक सवाल करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं सरकार आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर टीका आहे. फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली.

१२ तारखेच्या मोर्चाची चौकशी झाली पाहिजं

फडणवीस पुढे म्हणालं, “१२ तारखेला आपण बघितलं की, अशाच प्रकारचा मोर्चा अमरावतीमध्ये निघाला. सर्व प्रथम याला परवानगी होती की नव्हती?. होती तर किती लोकांची परवानगी होती? ती परवानगी कोणी दिली होती?. ज्यांनी परवानगी दिली होती?, त्यांनी काय म्हणून दिली होती?. या सर्वांची चौकशी झाली पाहिजं.”

फडणवीस नेमके काय म्हणालं

नांदेड, मालेगाव, अमरावती किंवा राज्यातील इतर भाग असेल एकाच दिवशी एकाच वेळी हे मोर्चे निघालं. सर्वत पहिल्यांदा तर यांची चौकशी झाली पाहिजं, अशी मागणी फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. “१३ तारखेला जी घटना घडली, ती १२ तारखेच्या घटनंची प्रतिक्रिया होती. १३ तारखेला जी काही हिंसा झाली. त्यांचे समर्थन मी करणार नाही. कोणत्याच हिंसेचे समर्थन केले जावू शकत नाही. हे सांगण्याचं कारण या करिता आहेत. आता राज्य सरकार, सरकारमधील अधिकारी, अमरावती जिल्ह्यातील मंत्री, पालकमंत्री हे सगळे १२ तारखेची घटना डिलीट करून जनू १३ तारखेची घटनेबद्दल बोलत आहेत,” असा आरोप फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रपूरमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांना शस्त्र बाळगण्याचे निर्देश

Gauri Tilekar

पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार! – अजित पवार

Aprna

मांसविक्रीवर बंदी तर या व्यवसायातील लोकांना आदित्यनाथांकडून दूधविक्रीचा सल्ला!

News Desk