HW News Marathi
महाराष्ट्र

विखे येताच विरोधकांकडून ‘आयाराम गयाराम जय श्रीराम’च्या घोषणा

मुंबई । नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात येताच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी “आयाराम गयाराम, जय श्रीराम” अशा घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला. यावेळी विरोधकांकडून ‘विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग’ अशाही घोषणा देण्यात आल्या. सोमवारपासून (१७ जून) राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे.

पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंत्र्यांच्या एन्ट्रीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा विधानभवनात दाखल झाले तेव्हा ‘आयाराम गयाराम जय श्रीराम’ अशा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.

इतकेच नव्हे तर ‘आले रे आले चोरटे आले’ असं म्हणत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देखील जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, याचे पडसाद निश्चितच अधिवेशनातही उमटण्याचीही शक्यता आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काहीतरी पदरात पाडून घ्यावे याच हेतूने अशोक चव्हाण आणि केसरकरांची नाराजी !

News Desk

“उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेसची लोकं जीवंत झाली”

News Desk

एकनाथ खडसेंना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावली 

News Desk