HW News Marathi
महाराष्ट्र

सेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना अर्थ नाही – पंकजा मुंडे

मुंबई | शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना-भाजपची युती २०१४ मध्येही तुटली होती. त्यानंतर आता पुन्हा युती तूटून राज्यात सरकार स्थापन होऊनही एक वर्ष उलटले आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर चर्चा करण्यात काही अर्थ उरलेला नाही, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

पंकजा मुंडे आज (१७ नोव्हेंबर) शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्यामुळेच मी त्यांना अभिवादन करण्यासाठी आल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनामध्ये आदराच्या भावना आहेत. स्मृतिस्थळ असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी मी आले. बाळासाहेब पक्ष म्हणून एका विचाराचे राहू शकत नाहीत, ते सर्वांचे आहेत. बाळासाहेब आम्हा मुंडे कुटुंबासाठी आदरणीय आहेत. मुंडेसाहेब आणि बाळासाहेब यांचे घरगुती संबंध होते. इतर अनेक पक्षातही असे संबंध असतात” असं पंकजा मुंडे बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिल्यानंतर म्हणाल्या आहेत.

जयसिंगराव गायकवाड यांची समजूत घालण्याचा पक्षाकडून प्रयत्न झाला, तरीही ते भाजप सोडून गेले. पक्ष आणखी ताकदीने निवडणूक लढेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान, ज्यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यावेळी पंकजा मुंडे यांना शिवसेनेतून ऑफरही देण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कंगना राणावत से दूर रहो”, गृहमंत्र्यांना धमकीचे फोन सुरूच…

News Desk

युती करायची नसेल तर हरकत नाही | सुधीर मुनगंटीवार

News Desk

मौजमजा करण्यासाठी ते शाळा चुकवून पळाले

News Desk