HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम मुझे कब तक रोकोगे?” -पंकजा मुंडे

बीड | भगवान गड येथील दसरा मेळाव्यासाठी प्रीतम मुंडे यांची रॅली मेळाव्याकडे रवाना झाली आहे. ठीकठीकाणी कार्यकर्ते या रॅलीचे स्वागत करत आहेत. माझ्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

या प्रसंगी बोलतांना पंकजा मुंडे म्हणल्या की, आज विजया दशमी आहे आणि भगवान बाबा यांच्या जन्म गावी आपण दसरा मेळावा साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संखेने उपस्थित जनसागर उसळला आहे.या जमलेल्या समुदयावरून पंकजा मुंडे यांनी पदर ओवाळून काढला. तर माझा जीव सुद्धा तुमच्यावरून ओवाळून काढेल असा शब्द पंकजा मुंडे यांनी जमलेल्या समुदायाला दिला. पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणल्या की हा मेळावा कोणता राजकीय मेळावा नाही तर सर्व जाती धर्माचा मेळावा आहे

तुम मुझे कब तक रोकोगे

मला वाटत होते हा मेळावा होतोच की नाही, अशी शंका उपस्थित झाली कारण सत्ता आपली नाही अशी कार्यकर्त्यांनी शंका दाखवली अतिवृष्टी आहे,

पण मी म्हणले की जनतेला ऊर्जा देण्यासाठी हा मेळावा घेणे गरजेचे आहे सत्ता नसलीतर काय झाले भगवान बाबांच्या चरणी येण्यासाठी सत्तेची गरज नाही असे पंकजा मुंडे म्हणल्या.

पुढे बोलतांना म्हनाल्या की,सरकार कोणाचेही असू मी याठिकाणी कोणत्या प्रवृत्तीचा नाव घेणार नाही कारण ही पवित्र भूमी आहे.असे नाव घेता धनंजय मुंडे वर निशाण साधला, त्या पुढे बोलतांना म्हणाल्या की,मी आंदोलन केले आणि सरकारने बीड साठी पॅकेज जाहीर केले. आता काय बीड जिल्ह्याची अवस्था पालक मंत्र्यांनी दिले का काही बजेट जे चालू आहे ते केंद्राचे आणि ते जेव्हा विरोधो पक्षात हेते तेव्हा ते सतत धमक्या द्यायचे.

अरे यांनी आपले मंत्रिपद गहन ठेवले आहे असे नाव न घेता धनंजय मुंडे वर निशाण साधला. पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणल्या की, या सरकार मध्ये महिला सुरक्षित नाही या जिल्ह्यात सर्वत्र अराजकता पसरली आहे. याविरोधात मी आवाज उचलणार आहे असे बोलतांना म्हणल्या.

भल्यासाठी ऊसतोड कामगार मंडळाची स्थापना केली मात्र

ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी ऊसतोड कामगार मंडळाची स्थापना केली मात्र म्हणावी तशी उभारणी या ठिकाणी झाली नाही मला माहित नाही का झाली नाही ते तीन पार्टी चे सरकार आहे . आणि या पक्षातील प्रत्येक नेता आपल्या आपल्याला सावरण्यासाठी आणि खुशी देण्यात मग्न आहेत. यांना जनतेच्या हितासाठी कधी काम करणार. यावेळी आपण सर्वजण संकल्प घेणार की, व्यसन मुक्ती साठी तंबाखू बंद करा हा संकल झालेल्या युवकांना दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा

Aprna

“आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावा”, राज्यसरकारला केंद्राकडून पत्र

News Desk

मराठा आरक्षण बांधलं काठीला, सरकार गेलं काशीला, सदाभाऊ खोतांचं दारात आंदोलन!

News Desk