HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

सध्या फोटोचे राजकारण सुरू म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांना लगावला टोला!

बीड:- आजादी का अमृत मोहोसच्चव हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळी शहरात भव्य अशी रॅली काढण्यात आली आणि या रॅलीस संबोधन करतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की,भारताला स्वत्रांत मिळून 15 ऑगस्ट ला 75 वर्षे पूर्ण होणार आणि ही आझादी आपल्याला अशीच मिळाली नाही तर त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. अनेकांचा त्याग आणि संघर्ष यामुळेच आपल्याला हे स्वतंत्र मिळाले आहे.

माझ्या कार्यकर्त्यांत खूप नाराजी होती मी त्यांना म्हणाले की तुम्ही नाराज होऊ नका करण आपल्याला भले ही काही नाही मिळाले पण गोपीनाथ मुंडे यांची शिकवण आहे की, मी झुकनार नाही मी मातनार नाही घेतलेला वसा मी टाकणार नाही.म्हणून मला 90 हजार लोकांनी मतदान केले आहे त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही असं बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या.

त्या पुढे बोलताना असे म्हणाल्या की,सध्या सत्ता आपली अली आहे बघू आपल्याला काही मिळतंय का नाही जर मिळाले तर परत आपला विकास पूर्ण करणार असल्याचे ही त्या म्हणाल्या.

काही दिवसानंतर मी प्रत्येक प्रभागात जाऊन पाहणी करणार आणि जी चांगले काम करतोय त्यास मी आगामी नगर परिषद निवडणुक लढवण्यासाठी तिकीट देणार भलेही तो पैशाने फाटका जरी असेल तरी चालेल असे ही बोकतांना पंकजा मुंडे म्हणाल्या.

महिलांवर अत्याचार हे सतत सुरू आहेत, महाराष्ट्रतील महिलांचे रक्षण करणे हे माझे अध्या कर्तव्य राहणार आहे. असे ही त्या बोलताना म्हणाल्या तर त्या पुढे बोलताना म्हणाल्या की,आज मला रॅली मध्ये राख्या बांधल्या मला प्रश्न पडला की मी काही पुरुष नाहीं मात्र विश्वासाने मला हा धागा बांधला गेला आहे मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही मला जेव्हा ही भेटाल तेव्हा मला असाच विश्वासाचा धागा बांधा आपले असेच ऋणानुबंध अधिक मजबूत होतील असे ही त्या बोलताना म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पंकजा मुंडे यांनी लगावला टोला म्हणाल्या, सध्या फोटो चे राजकारण सुरू झाले आहे. गोगल गाई मुळे खूप शेतीचे नुकसान झाले आहे महिलांवर अत्याचार झाले आहेत आणि अश्या ठिकाण फक्त जाऊन फोटो काढून दाखवण्यापूरते सध्या काम सुरू आहे. त्यांना आर्थिक समाधान करणे गरजेचे असतांना फक्त तुम्ही फोटो काढून असे सोसिएल मीडियावर टाकत आहेत हे चुकीचे आहे असे फार काळ चालणार नाही म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, मी उजवीकडे गेले तर जमेल का की मी डावीकडे गेल्यास जमेल असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व जनतेला विचारला असता जमलेल्या नागरिकांनी पंकजा मुंडे यांना कुठेही न जाण्यास नकार दिला तर आम्ही आपल्या सोबत आहोत ताई असे म्हणत पंकजा मुंडे यांना धीर दिला.मात्र नेमके पंकजा मुंडे यांनी उजव्या आणि डाव्या बाजूस गेले तर चालेल का असा सवाल का उपस्थित केला यावर मात्र चर्चेला उधाण आले आहे.

पंकजा मुंडे नाराज आहेत का?पंकजा मुंडे यांना मंत्री मंडळात स्थान मिळणार का? अश्या एक ना अनेक प्रश्नानी जनतेमध्ये उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षवाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवेन !

News Desk

पुण्यात पुन्हा एकदा आढळला गवा!

News Desk

“मी ओबीसी समाजाला दुखावून काहीच करणार नाही”, संभाजीराजेंची ग्वाही

News Desk