HW News Marathi
महाराष्ट्र

पवारसाहेब आता तुमच्या कोर्टात चेंडू आहे, तुम्हीच शेतकऱ्यांचा विषय सोडवावा- पंकजा मुंडे

बीड | भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आज (२५ ऑक्टोबर) भगवान गडावरुन ऑनलाईन पद्धतीने लोकांशी दसऱ्याच्या निमित्ताने संवाद साधत आहेत. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडत आहेत. मात्र, सावरगाव येथे पोहोचल्यानंतर कार्यकत्यांनी पंकजा मुंडेंचे जंगी स्वागत केले. दरम्यान यावेळी हेलिकॉप्टरने न येतां पंकजा मुंडे गाडीने मेळाव्यासाठी आल्या. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने जे अतोनात हाल झाले त्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी असे म्हटले की अतिवृष्टीमूळे शेतकरी बेजार झाला आहे. तसेच, ऊसतोड कामगारांचा विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की कोरोनाची लागण लागण होती तेव्हा माझ्या ऊसतोड कामगारांच्या भाकऱ्या भिजत होत्या.

तसेच, पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे जे पॅकेज जाहीर केले त्याचे स्वागत करत त्यांनी ही मदत अपुरी असल्याचेही म्हटले आहे. आणि यावर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मदतीला हात पसरला आहे. त्या म्हणाल्या की, आता तुमच्या कोर्टात चेंडू आहे. तुम्ही किती बैठका लावता ते तुम्ही ठरवा. शरद पवारांकडे विनंती करत त्या म्हणाल्या की, शरद पवारांनीच हा विषय सोडवावा. आम्ही सुरुवात केली आहे आता तुम्ही पुढचं बोला, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी महामंडळाच्या तिकीटात १५ जूनपासून १८ टक्के वाढ

swarit

बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी क्रांती मोर्चा

News Desk

कृषीतज्ञ शरद पवारांचे फडणवीसांकडून कौतुक, तर महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप !

News Desk