HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलं?”, आदित्य ठाकरेंना संतप्त नागरिकांचा सवाल

चिपळूण | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज(२९ जुलै) चिपळूणला पूरपरिस्थितीची पाहणी करायला गेले आहेत. यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी तुम्ही पर्यावरणमंत्री आहात, कोकणात काय चाललंय हे पाहिलं आहे का, अशी विचारणा आपले सर्वस्व गमावलेल्या संतप्त चिपळूणकरांनी केली आहे.

पर्यावरण मंत्री असून तुम्ही काय केलंत?

आदित्य ठाकरे आज(२९ जुलै) चिपळूण दौऱ्यावर आहेत. तेव्हा तिथल्या नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न केला आहे. तुम्ही पर्यावरण मंत्री आहात, कोकणात काय चालले आहे, तेथील परिस्थिती काय आहे? हे पाहायला तुम्ही येत नाही. तुम्ही कधीतरी येता, महिन्यातून एक फेरी तरी होते का तुमची? इथे आमच्या भागातील पूल वाहून गेलेत, अशी कैफियत मांडली. यावेळी पूरग्रस्तांना पंचनामे झाल्यावर भरीव आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

नेत्यांनी दौऱ्यावर जाणं टाळावं

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या भूकंपा वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे अनावश्यक दौरे टाळावे. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली ते दहा दिवसानंतर आले. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो . पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो, असं शरद पवार म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“साधेपणानं कार्यक्रम कर असं सांगितलं होतं पण…”,अजितदादांनी टोचले आमदाराचे कान

News Desk

दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न जे शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दाखवले, ते जर आपण पूर्ण करु! – उद्धव ठाकरे

Aprna

सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली 

News Desk