HW News Marathi
महाराष्ट्र

एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण, राऊतांचा न्यायव्यवस्थेवर सवाल

मुंबई | “एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळते. परंतु, महाविकासआघाडी सरकारच्या नेत्यांना दिलासा का मिळत नाही?, त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळत नाही,” असे सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर उपस्थित केले आहे.  “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीला संपूर्ण जग अभिवादन करत आहे. त्यांनी पददलितांना संगर्घ करायाला शिकवले, संघर्षातून स्वाभिमाने उभे राहायला शिकवले आणि स्वत:चे स्थान निर्माण करण्यात बळ दिले. आम्ही आंबेडकरांचे दररोज स्मरण करतो,   तुम्ही जे संविधान निर्माण केले आहे. ते संविधान त्याच ताकदीने या देशात न्यायाव्यवस्था आणि कायदा जिंवत राहो,” असे राऊतांनी आज (१४ एप्रिल) प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. 

राऊत म्हणाले “जे स्वत: शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात त्याचे पितळ उघड पडले आहे. तेव्हा जर कोणी म्हणत असेल तर त्यांना म्हणू द्या आरोपी आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. आएनएस विक्रांत ५८ कोटीचा घोटाळा झालेलाच आहे. पैशे गोळाकरून त्यांचा अपहार झालेला आहे. खरे म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी यासगळ्या गोष्टीकडे पाहतोय. काही महिन्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना हे अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्याचे जे काही प्रयत्न सुरु आहेत. हा एक गंभीर प्रकार देशात आणि महाराष्ट्रात सुरू आहे. मग हे दिलासे महाविकासआघाडीच्या नेत्यांना का मिळत नाहीत. त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळू नये. मग विशिष्ट एका पक्षाचे, भूमिकाचे आणि वाचारांचे लोकांना मिळते.

 जामिनावर सुटलेल्या आरोपीने संयम बाळगायला हवा

“आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेल्या पैशा घोटाळा झाल्याच्या आरोपीला तात्पुरता जामीन मिळाला आहे. अपहार १०० टक्के झाले असून आरोपीने निर्दोष सुटलेले नाहीत. आरोपी भूमिगत, फरार झाले होते. आणि खाली न्यायालयाचा निकाल पाहिला तर आरोपी निर्दोष नाहीत. जर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल पाहिला तर आरोप निर्दोष नाही.  या आरोपीची कसून चौकशी झाली पाहिजे, त्यांनी पोलीस ठाण्यात हजर झाले पाहिजे. त्यामुळे आरोपीने जास्त वचवच करू नये. तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीने संयम बाळगायला हवा. आपण आरोपी आहात हे विसरु नका. तुमच्यावर आरोपपत्र असून तुम्ही जनतेच्या पैशाचा अपहार केला आहे. टीव्ही समोर येवून मोठमोठ्याने बोलल्याने तुमचे आरोप धून निघत नाहीत. यापेक्षाही भयंकर प्रकरण बाहेर येणार आहेत,” असे ते म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या विरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा !

News Desk

Hw Exclusive | खुप मोठ्या प्रमाणात कर्ज काढावे लागणारचं आहे

Arati More

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधिमंडळाच्या नेत्यांची होणार बैठक

News Desk