HW News Marathi
महाराष्ट्र

Poladpur Bus Accident : आंबेनळी घाट दुर्घटनेतील बस बाहेर काढणार ?

सातारा | आंबेनळी घाटातील अपघाताला दोन महिने उलटल्यानंतर महाबळेश्वरचे ट्रेकर्स यांनी आज ही बस दरीतून बाहेर काढण्यासाठी सकाळपासून कमला लागले आहे. हा घाटाला तीव्र उत्तर, उभा कडा यामुळे कामात अनेक अडथळे येत असल्याने आज महाबळेश्वर-पोलादपूर मार्गवरील वाहतूक विस्कळीत होणार आहे.

महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात २८ जुलै २०१८ रोजी दापोली कृषी विद्यापीठाची बस ७०० ते ८०० फुट खोल दरीत कोसळली होती. त्यात विद्यापीठाच्या ३४ पैकी ३३ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव कर्मचारी वाचल्यामुळे सर्वांच आश्चर्यकारक वाटले. यानंतर प्रकाश सावंत-देसाई यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी या दुर्घटनेत मृत पावलेल्या नातेवाईकांनी केली आहे.

कुलगुरू भवनातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काढलेली ही सहल होती. यामध्ये इतर विभागातील कर्मचारी, त्यात प्रामुख्याने कारकून आणि वरिष्ठ पदावर काम करणारे कर्मचारी सहभागी झाले होते. साधारणपणे दरवर्षी हे कर्मचारी जुलै-ऑगस्टदरम्यान वर्षां सहल काढतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र विधानसभेकरिता योगी आदित्यनाथ यांची मुंबईत सभा

News Desk

‘परमबीर सिंह यांची हायकोर्टात याचिका’, चांदिवाल आयोगाची गरच काय!

News Desk

गोपिचंद पडळकर म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ सुनिल शेळकेंनी घेतला खरपूस समाचार!

News Desk