HW News Marathi
महाराष्ट्र

अमरावतीत मोठा तणाव, ‘या’ चार जिल्ह्यांतून मागविले पोलीस

मुंबई | त्रिपुरा हिंसाचाराचं पडसाद गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात पडले. राज्यात अमरावतीत काल (१२ नोव्हेंबर) रझा अकादमीच्या वतीने काढलेल्या रॅलीत जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे हिंसक वळण आले होते. दरम्यान, कालच्या घटनेविरोधात भाजप आणि हिंदू संघटनांनी अमरावतीमध्ये आज (१३ नोव्हेंबर) कडकडी बंद पुकारला होता. यावेळीजमावानं रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत दुकांनाची तोडफोड करण्यात आली होती. यामुळे अमरावतीत तणावाचं वातावरण निर्णाण झाले होते. यानंतर अमरावतीत वाढता तणाव पाहात बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यातून पोलिसांची टीम मागवण्यात आली.

अमरावतीत पोलिसांनी सुरक्षेसाठी कलम १४४ लागू केले आहे. यानुसार पोलिसांनी जमावबंदी अर्थात कर्फ्यू लागू केली आहे. त्याचबरोबर अमरावतीत कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये, यापार्श्वभूमीवर अमरावती शहरात पुढील चार दिवस इंटनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. १४४ कलम लागू असल्यानं अमरावती परिसरात कोणतीही हिंसक घटना घडवणाऱ्यांना पोलीस तत्काळ अटक करू वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकतं.

नेमके काय आहे प्रकरण

त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित हिंसाचार पार्श्वभूमीवर राज्यात विरोध दर्शविणारी रॅली काल ( १२ नोव्हेंबर) काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणींनी दुकानांची तोडफोड केली तर काही दुकानं जबरदस्तीने बंद करण्यात आली. राज्यातील मालेगाव, नांदेड आणि अमरावती या ठिकाणी रॅलीला हिंसक वळण आलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रायगड किल्ला व परिसर विकासाच्या कामासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार – अजित पवार

News Desk

खडसेंना पुन्हा कोरोनाची लक्षणे, ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाणार?

News Desk

साहित्य संमेलन ऐतिहासिक होण्यासाठी उदगीरकरांनी झोकून देऊन काम करावे! –  संजय बनसोडे

Aprna