HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, नारायण राणेंचा हल्ला

मुंबई | भाजप खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत कालच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाला उत्तर दिले आहे. अनेक विषयांवर बोलत त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव आले होते त्यावरच राणेंनी आज भाष्य केले आहे.

“सुशांत सिंह राजपूतची प्रकरणी आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. सुशांतच्या प्रकरणात त्याला मारलं, कशानं मारलं सर्व बाहेर येईल. दिशा सालियनवर बलात्कार कुणी केली, तिला वरून कुणी टाकलं, हे सर्व समोर येईल,” असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी अशी भाषा सोडली नाही, तर आमचा तोल गेल्यास महागात पडेल. साहेबांकडे पाहून गप्प बसलो. आमच्याकडे नजर टाकू नका, अन्यथा पळताभूई थोडी होईल. कुणाला वाघाची भाषा करता, शेळपट कुठलं!”

“उद्धव ठाकरेंना बजेट कळतो का, जीडीपी कळतो का, राज्याची अर्थव्यवस्था कळते का? शून्य माहिती आहे. अधिकारी हसतात. बुद्धू मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे, कालचा दसरा मेळावा हा फक्त विरोधकांना अपमानित करण्यासाठी द्वेषानं केलेलं भाषण आहे. त्या भाषणाला अर्थ नाही. थापाबाज, दिशाभूळ करणारा मुख्यमंत्री आहे. मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. मराठ्यांचा द्वेष करणारा मुख्यमंत्री आहे.”

“मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाहीत. शिवसैनिकही मानत नाहीत. वर्षावर भेटत नाहीत, मातोश्रीवर प्रवेश नाही. खेळण्यातला मुख्यमंत्री आहे. कठपुतळी आहे. कठपुतळी दुसऱ्याच्या हातावर नाचते तरी, यांना नाचताही येत नाही,” असे आरोप राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत. तसेच, शिवसेना लवकरच संपेल असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…” अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

News Desk

पुणे मॅरेथाॅनमध्ये झिके अटलाव डेबेबे विजयी 

News Desk

BMC मधील प्रभाग रचनेतील बदललेल्या नकाशाबाबत भाजप नेत्याचा आक्षेप

Aprna