HW News Marathi
महाराष्ट्र

सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, वडेट्टीवारांचा नारायण राणेंना टोला!

जालना। ओबिसींमुळे मंत्री झालो असून मंत्रीपद ही काही बापाची खाजगी जहागीरदारी नाही. त्यामुळे ओबीसीसाठी मंत्रीपद खपले तरी चालेल असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.जालन्यातील दादडगाव येथे मंडल आयोग लागू दिनानिमित्त सामाजिक न्याय मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यात ते बोलत होते.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आम्ही राज्यात वेटींगवर आहोत असं वक्तव्य केलंय.त्यांच्या या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेतला.राणे वेटींग वर आहेत मग आम्ही काय ऑक्सिजनवर आहोत का असा टोला लगावत सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही असं सांगायला विजय वडेट्टीवार विसरले नाहीत.

आम्ही फक्त बशा धुणारे झालोय

“सत्ता कुठल्याही पक्षाची असली तरी पहिल्या बाकावर कोण बसतं? आम्ही फक्त बशा धुणारे झालोय. आम्हाला भजे दिले की, आम्ही त्यात खुश होतो. पण ते मटण खातायेत ना. ज्यांच्यामुळे मंत्री झालो त्यांच्यासाठी खपायला शिकलं पाहिजे,” असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं.

औरंगाबादमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वडेट्टीवारांनी ओबीसींच्या सत्तेतील वाट्याबाबत उपस्थितांसमोर आपली मतं मांडली.राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ठराव करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलीय. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी निधी दिला

यावेळी त्यांनी ओबीसींना एकत्र येण्याची हाकही दिली. खुर्चीचे चारही पाय हलवण्याची ताकद ओबीसी समाजात निर्माण झाली पाहिजे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये एकमत व्हावं लागतं. आमचे मुख्यमंत्री समजदार आहेत. ओबीसी हॉस्टेलला निधी मिळत नव्हता, मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून ओबीसी हॉस्टेलला निधी उपलब्ध करून दिला. ओबीसींना 2 हजार कोटी रुपये स्कॉलरशिप मिळते. मात्र फक्त 100 कोटी रुपये केंद्र सरकार देतं, असं त्यांनी सांगितलं.

त्या जागा कुणालाही देवू देणार नाही

इंपेरिकल डाटासाठी भाजप सरकारच्या काळातही पत्र पाठवण्यात आले होते. आमचं सरकार आल्यानंतरही आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. पण केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही. ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आमच्या हक्काच्या आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा

News Desk

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; पुढील शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार

Aprna

यंदा तरी मान्सून महाराष्ट्राची तहान भागवणार का ?

News Desk