HW News Marathi
महाराष्ट्र

दिल्लीच्या वरद हस्तामुळेच प्रकाश मेहतांचा बचाव

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गैरव्यवहाराचा आरोप असलेले गृहनिर्माण मंत्री अद्यापही पदावर आहेत. केवळ दिल्लीतूनवरद हस्त असल्यामुळेच त्यांचा बचाव केला जात आहे, असा थेट आरोप माजी मुख्यामंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला.

राज्य विधिमंडळ गाजवून झाल्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीयपातळीवर नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहेत. राज्यातील मंत्र्यावरील आरोपांची प्राथमिक कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे. न खाऊँगा, न खाने दूँगा हे स्वत:चे शब्द पंतप्रधान मोदींनी आता खरे करून दाखवावेत, असेही ते म्हणाले.

तसेच मेहतांच्या चौकशीचे आदेश दिल्याबद्दल त्यांनी फडणवीसांचे आभारही मानले. मात्र चौकशी होईपर्यंत मेहतांचा राजीनामा घ्यावा, चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत केली जावी, संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या सर्व चालू प्रकल्पांची छाननी केली जावी आणि झोपडपट्टी पुनवर्सन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवृत्तीच्या दोन आठवडे आधी मंजूर केलेल्या १३७ फायलींची फेरचौकशी व्हावी, अशा चार मागण्याही त्यांनी केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंहांच्या दोन पोलीस निरीक्षकांना CID कडून अटक

Gauri Tilekar

अखेर शिक्कामोर्तब ! मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

News Desk

तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता तर तुम्ही शेतकऱ्यांचे विश्वासघाती राजे होता – सदाभाऊ खोत 

News Desk