HW News Marathi
महाराष्ट्र

प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ, गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात

औरंगाबाद | संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणाच्या चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी प्रादेशिक साखर संचालकांकडून लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

३ महिन्यांच्या काळात लेखापरीक्षकांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या घोटाळ्याचे सूत्रधार कोण, याचा उलगडा होईल. मात्र, या चौकशीमुळे प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

गापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम १५ कोटी ७५ लाख होती. पण, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

२०१३ मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. पण, त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात १४ सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परिवहन मंत्र्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा!

News Desk

आता याचिकाकर्ते मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

News Desk

“जाणीवपूर्वक माझ्या परिवाराला छळण्याचा प्रयत्न”, ईडीच्या समन्सवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

News Desk