HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला, दरेकरांचा संजय राऊतांवर आरोप

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत हे परस्पर विरोधी भूमिका मांडून काय साधत आहेत याचं आश्चर्य वाटतं. बिहार निवडणुकीचे निकाल आले तेव्हा म्हणाले की नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील. त्यानंतर संजय राऊत म्हणाले की तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेले नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यास तो बिहारच्या जनतेचा अपमान ठरेल. जर हाच नियम महाराष्ट्रात लागू केला तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का? असा प्रश्न आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.

बिहारबाबत शिवसेना सातत्याने भूमिका बदलताना दिसते आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले तर श्रेय शिवसेनेला जाईल असं संजय राऊत म्हणाले होते. आता संजय राऊत यांनी उलट भूमिका घेतली आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केल्यास तिथल्या जनतेचा, जनाधाराच अपमान होईल असे संजय राऊत म्हणत आहेत. शिवसेना मांडत असलेली ही भूमिका दुतोंडी नाही का? असाही प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.

कोरोना आणि लॉकडाउन यामुळे महाराष्ट्रातले व्यवसाय आणि उद्योग बंद पडले आहेत. बेरोजगारी वाढते आहे. मात्र या प्रश्नांपासून पळ काढण्याची ठाकरे सरकारची भूमिका दिसते आहे म्हणूनच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनाचा कालावाधी ठरवू असे सांगितले जाते आहे असंही दरेकर म्हणाले. हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रयत्न आणि अधिवेशनापासून पळ काढण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे असंही दरेकर म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळीत आयोजित कार्यक्रमात मुंडे बहीण भाऊ एका मंचावर !

News Desk

मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करायाचे !

swarit

#Coronavirus : पुण्यात आज ८० नवे कोरोना पॉझिटिव्ह, १३ जण कोरोनामुक्त

News Desk