HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण  केले आहे. पंतप्रधान आज (६ मार्च) सकाळी ११ वाजता पुण्यात दाखल झाले होते. पुण्यात दाखल झाल्यानंतर पुणे विमानतळवर पंतप्रधानांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले. पंतप्रधानांनी अनावरण केलेल्या महाराजांचा पुतळा १८५० किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे ९.५ फूट आहे. पंतप्रधान हे आज सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहे. 

पंतप्रधानांचा ताफा पुण्यातील ज्या ज्या रस्त्यांवरून जाणार आहेत. त्या ठिकाणची सर्व दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक दुकान बंद, हॉटेल्स देखील दुपारपर्यंत बंद असतील. काँग्रेसमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढल्याचे वादग्रस्त विधान पंतप्रधानांनी संसदेत केले होते. या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून आंदोलन सुरू आहेत. तसेच पुणे मेट्रोचे उदघाटन, पीएमपीएलच्या १०० ई-बस आणि ई-बस डेपोचे लोकार्पण, एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदींची सभा असणार आहे.

पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण ३२.२  किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प ११,४००  कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करतील आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे घ्या

News Desk

कोरोना रुग्णांची वाढती संख्या; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू

Aprna

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!; ‘म्हाडा’च्या परीक्षा रद्द झाल्याने फडणवीसांचा संताप

News Desk