HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात भगवा एकहाती फडकला पाहिजे असे म्हटले होते. त्यावरुन भाजपने मुख्यमंत्र्यांना टोला लगावण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते असं वक्तव्य भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं गर्वाने सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत.” असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहेत. तर चंद्रकांत पाटील असं म्हणाले होते की, मुख्यंमंत्र्यांनी भगव्या ऐवजी तिरंगा फडकवू असे म्हणायला हवे होते.

एवढंच नाही तर केंद्र सरकारवर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेवरुनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “केंद्र सरकारवर टीका करणं म्हणजे स्वतःचं अपयश झाकायचं आणि केंद्राकडे बोट दाखवायचं असा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता? ” असाही प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना भेटण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा” असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले.

यावर शरद पवार काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. “शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३० ते ३५ वर्षे ऐकतोय आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत आहे” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे”, बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

Aprna

महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढवण्याबाबत जयंत पाटील म्हणतात …

Arati More

नवाब बेनकाब हो गया है, केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव का आणताय? – आशिष शेलार

Aprna