HW News Marathi
देश / विदेश

“रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक”, राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदी सरकारवर कायम टीका करत असतात. त्यांच्यावर निशाणा साधायची एकही संधी ते सोडत नाही. आजही त्यांनी बेरोजगारीवरून त्यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. रोजगाराच्या बाबतीत सरकारची धोरणं निष्क्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक आहे

राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक आहे. ते कोणत्याही प्रकारच्या ‘मित्रहीन’ व्यवसायाला किंवा नोकरीला प्रोत्साहन किंवा समर्थन देत नाहीत. ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत त्याही हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीयांकडून आत्मनिर्भरतेचं ढोंग अपेक्षित आहे. जनहितार्थ जारी, असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. दुसरीकडे सीएमआयईने जारी केलेल्या अहवालात चिंताजनक माहिती समोर आली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये १५ लाखांहून अधिक लोकं औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रांतून बेरोजगार झाले आहेत, अशी माहिती सीएमआयईने आपल्या अहवालात दिली आहे.

मोदी सरकारचा पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला

महागाईच्या प्रश्नावरुन मोदी सरकारचा पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सातत्याने दरवाढ करत गॅस सिलिंडर 190 रुपयांनी महाग केला आहे. युपीए सरकारवेळी 440 रुपये असणारा हाच LPG गॅस आता 900 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस 900 रुपयांपर्यंत महाग केला आहे.

एवढा महाग गॅस गरीब, सामान्य जनेतला परवडणारा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य जनेतला वाऱ्यावर सोडून फक्त त्यांच्या मोजक्या उद्योगपती मित्रांचेच हित जोपासत आहेत. गेल्या 8 महिन्यात केंद्र सरकारने 67 वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल 107 रुपये, डिझेल 96 रुपये लिटर झाले आहे. गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल 25 लाख कोटी रुपयांची नफेखारी केली आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

महागाई ‘डार्लिंग’ वाटत आहे

‘केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना महागाईची झळ सामान्य जनतेला पोहचू नये यासाठी इंधन आणि गॅसवर सबसिडीच्या रुपाने मदत दिली जात होती. ज्याचा लाभ जनतेला होत होता, ती मदतही मोदी सरकारने आता पूर्णपणे बंद केली आहे. यूपीए सरकारवेळी ‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता हीच जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटत आहे’.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुलभूषण जाधव प्रकरणी हस्तक्षेपास युनोचा नकार

News Desk

कश्मीरमध्ये भाजपच्या सचिवाची गोळ्या झाडून हत्या

swarit

पार्थ पवारांची ‘ती’ भूमिका व्यक्तिगत, आमचा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास !

News Desk