HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींसोबत अशी काय झाली चर्चा ?

नवी दिल्ली | देशात सुरू असलेल्या काही मुद्द्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात दिल्लीत बैठक झाली. संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली. देशात लोकशाही राहिली आहे का? लोकशाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, असं राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले. तसंच राहुल गांधींसोबत काय चर्चा झाली? या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मात्र संजय राऊत यांनी टाळलं. तसंच दोघांमधील चर्चा जाहीर करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले…

यूपी सरकारच्या या कारवाईविरोधात संपूर्ण विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची गरज

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. लखीमपूर खिरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात एका स्थानिक पत्रकारासह एकूण ८ जणांचा मृत्यू झाले आहेत. प्रियांका गांधींना केलेली अटक आणि शेतकऱ्यांना भेटायला जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या रोखल्याप्रकरणी संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. विरोधी पक्षांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असं राहुल गांधींची भेट घेण्यापूर्वी संजय राऊत म्हणाले. लखीमपूरची घटना लांछनास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. लखीमपूर खिरीमधील हिंसाचाराच्या घटनेने देश हादरला आहे. प्रियांका गांधींना अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना पीडित शेतकरी कुटुंबांना भेटण्यापासून रोखलं जात आहे. यामुळे यूपी सरकारच्या या कारवाईविरोधात संपूर्ण विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले.

ही सदिच्छा भेट होती. बऱ्याच मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. काँग्रेसबाबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर राहुल गांधी समाधानी आहेत. पण चर्चेतील सर्वकाही बाबी सांगता येत नाहीत. त्या चार भींतीतल्याच असतात, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या बोलण्याचा रोख कुठल्या मुद्द्यावर होता हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Aprna

काश्मीरच्या त्रालमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

“नितीश कुमार त्यांच्या सोबत झालेला घात पचवतील?” रोहित पवारांचा सवाल  

News Desk