HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या भारत बंदला राहुल गांधींचा पाठिंबा; भाजपवर डागलं टीकास्त्र

नवी दिल्ली। कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंदची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. तसंच, केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. मोदी सरकारसा शोषण करणारं सरकार म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत शेतकऱ्यांच्या भारत बंदला समर्थन दिलं आहे. शेतकऱ्यांचा अहिंसक सत्याग्रह आजही अखंड आहे. पण शोषण-कार सरकारला हे आवडत नाही, म्हणूनच आज भारत बंद आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा

केंद्र सरकारने आणलेल्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने आज ‘भारत बंद’ ला हाक दिली होती. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या बंदला सकाली ६ वाजल्यापासून सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांनी विविध महामार्ग तसंच रेल्वे रुळ अडवले आहेत. विरोध लक्षात घेऊन दिल्ली वाहतूक पोलिसांनी गाझीपूर सीमेवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे, तर शेतकऱ्यांनी पंजाब-हरियाणा दरम्यान शंभू सीमा बंद केली आहे. काँग्रेस, डावे पक्ष, राजद, बसपा आणि सपासह देशातील जवळपास प्रत्येक विरोधी पक्षाने आधीच शेतकरी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या गैरहजेरीत कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा एकत्र चिपळूण दौऱ्यावर

News Desk

सीएलएसएस योजनेच्या विस्ताराची घोषणा

News Desk