HW News Marathi
महाराष्ट्र

दोन वर्षांत आजपर्यंत एक टक्काही काम झालेले नाही !

मुंबई | रायगड प्राधिकरणातील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चा करण्यासाठी खासदारयुवराज संभाजीराजे छत्रपती हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. संभाजीराजेंनी आज (२९ डिसेंबर) मातोश्रीवर जावून रायगड प्राधिकरणातील भ्रष्टाचारावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक जवळपास अर्धा तास सुरू होती. याबैठकीत रायगड किल्ल्यावरील कामाबाबत नाराजी व्यक्त दोन वर्षांत आजपर्यंत एक टक्काही काम झालेले नाही. संभाजीराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना त्यांची आप

गडावर एखाद बांधकाम करायचे असल्यास त्यासाठी अनेक नाहरकतींची आवश्यकता असते, हा नियम रोप- वे वाल्यांना लागू नाही. रायगड प्राधिकरण माझ्या संकल्पनेतून तयार झाले. रायगड संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपये दिले होते. यामध्ये गावांचे रस्ते, सुशोभिकरण, महाड-रायगड रस्त्याचे १४७ कोटींचे कंत्राट देण्यात आले. मात्र, दोन वर्षांत आजपर्यंत एक टक्काही काम झालेले नाही. या एमबी पाटील कंत्राटदाराने दुसऱ्या कंत्राटदाराला काम देण्याचे ठरविले. शासनाने त्याला ५ टक्के आगाऊ दिले. आता नव्या कंत्राटदाराला ८ टक्के देण्यात येतील, असा आरोप संभाजी राजे यांनी केला.

संभाजीराजे यांनी रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत म्हणाले की, “रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाला आहे. तसेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामे पुरातत्व विभागाकडून रोखली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केल. “रोप-वेचा मनमानी कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा देखील संभाजीराजेंनी यावेळी दिला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रोप वेच्या कंपनीला नोटीस पाठविली होती. सरकारच्या पुरातत्व विभागाच्या या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यासाठी संभाजी राजे नुकतेच मातोश्रीवर चर्चा करण्यासाठी गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

४ माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनल सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य

News Desk

कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारच, चंद्रकांत पाटलांचा टोला

News Desk

घाबरलो नाहीत आणि घाबरणारही नाही, राहुल गांधींचं आवाहन

News Desk