HW News Marathi
महाराष्ट्र

पुन्हा रेल्वे अपघात; दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डब्बे घसरले

मुंबई : उत्तर भारतातून सुरू झालेले रेल्वे अपघातांचे सत्र अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी हार्बर मार्गावर लोकल घसरल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डबे मध्य रेल्वेवरीलआसनगाव- वाशिंद स्थानकांदरम्यान रुळांवरून घसरले. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रुळाखालीलखडी वाहून गेल्याने हा अपघात झाला असून यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

दुरांतो एक्स्प्रेस नागपूरहून मुंबईकडे येत असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास आसनगाव- वाशिंददरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनसह चार डबे रुळावरून घसरले. अपघातामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची वाहतूक खोळंबली आहे. रेल्वेची आपात्कालीन गाडी व पथक घटनास्थळी रवाना झाले असून घसरलेले डब्बे रुळांवरून हटविण्याचे काम सुरू आहे, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जैन यांनी सांगितले. दरम्यान, अपघातातील जखमींनास्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही घरं सोडू नका, मी वरिष्ठांशी बोलतो”, राज ठाकरेंनी दिले पोलीसांच्या पत्नींना आश्वासन

News Desk

गरिबांना लुटायचं आणि उद्योगती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम !

swarit

रश्मी ठाकरेंनी अन्वय नाईकांकडून जमीन खरेदी केली, त्याची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मागणी

News Desk